-
•
महपुरुषांना आराम करू द्या आत्ता
आज आपण काय करतोय, त्याचावर विचार करायची वेल आली आहे "माझ्या मराठी मित्रांनो प्लीस इतिहासातून बाहेर पडा, शिवाजी महाराज ३५० वर्षांपूर्वी होऊन गेले. फुल्यांना सुद्धा दोनशे वर्षे होत आलीत जन्मुन. शाहू महाराज जाऊन होईल शतकभर. किती वर्ष कॅश करत बसणार हयाना? गेल्या पन्नास साठ वर्षात काय आहे तुमच्या कडे दाखवायला? मोडकळीला आलेली शहरे, भकास खेडी, जाती आणि धर्माचे तुकडे झालेला समाज, जातीय, धार्मिक विखार, बेकारी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, बायकांवर अत्याचार, तोट्यातली शेती , भिकार विद्यापीठे, भकास डोंगर, तुटलेली जंगले, ह्या सगळ्यावर माजलेले गुंड? कसला महाराष्ट्र घडवतो आहे आपण? महापुरुषान आराम करू द्या जरा. महापुरुषाना सुट्टी द्या थोडे दिवस आणि तुम्ही काम करा. जबाबदारी घ्या स्वतःची. \- नीरज हातेकर" Source: twitter7
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
navya