IndiaReply Logo Indiareply
Sign In Sign Up
  • Home
  • Popular
  • Explore
  • All
    • Loading...

Tell us about your community

i/communityname

Your community description

Info
Install our Android app to unlock all features.
i/Maharashtra
Chat About

Community Information

i/maharashtra

  • sainsamridh_01

    •

    5 months

    सरकार आपल्याला बऱ्याच सुविधा देतय आणि आपल्या लोकांना ते माहीतच नाही आहे त्याचा उपभोग फक्त परप्रांतीय घेतायत

    मी आज आमच्या एका पाहुण्याला बघायला मुंबईच्या सायन रुग्णालयात गेलो होतो. ते सरकारी हॉस्पिटल आहे. तिकडे जवळ जवळ सगळंच फ्री आहे. आमच्या घरात जवळ जवळ सगळ्यांच्या ट्रीटमेंट खाजगी रुग्णालयात झाल्या आहेत आणि आम्ही लाखोंने पैसा घालवला आहे खाजगी रुग्णालयात. त्या सायनच्या सरकारी रुग्णलयांमध्ये जनरल वार्ड मध्ये बेडचे पैसे ही चार्ज नाही करत (खाजगी वार्ड पाहिजे असेल तर दिवसाचे फक्त २०० रुपये). जवळ जवळ सगळ्या प्रकारचे टेस्टस् जे पेशंटवर करतात त्या सगळ्या टेस्ट फ्री आहेत. पेशंटला सकाळी नाश्ता, दोन वेळेस जेवण फ्री. आणि ते सगळ्यांना फ्री आहे फक्त आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना नाही. अगदी हे हृदय बायपास सारख्या लाखो रुपयाचं मोठे ऑपरेशन सुद्धा सवलत मिळते. तुम्ही जर केशरी रेशन कार्ड धारक असाल तर अजून सरकारी सवलती. अशे बरेच हॉस्पिटल्स आहेत मुंबईचं के ई एम हॉस्पिटल मध्ये सुद्धा जवळ जवळ सगळंच ट्रीटमेंट फ्री आहेत. आमच्या एका पाहुण्यांनी हल्ली दाताच्या ट्रीटमेंट साठी २-३ लाख खर्च केला, मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये दाताच्या सगळ्या ट्रीटमेंट फ्री आहेत. गरोदर बाईच्या डिलिव्हरी साठी खाजगी रुग्णालय किती पैसा घेतात पण वाडिया सारख्या रुग्णालयात ते फ्री आहे. आणि अश्या बऱ्याच सुविधा आहेत जे मला देखील माहीत नाहीत. काल जेव्हा मी त्या सायन रुग्णालयात गेलो तेव्हा तिकडे सगळे परप्रांतीय भैये आणि मुसलमान होते. तुम्ही के ई एम हॉस्पिटलच्या फूटपाथ वर बघाल सगळ्या परप्रांतीयांनी तिकडे येऊन ठाणच मांडली आहे. सरकारी हॉस्पिटल असल्याने आणि सगळं फ्री असल्याने कदाचित अपॉइंटमेंट मिळायला थोडाफार वेळ लागू शकतो पण तरी सगळे उपचार फ्री मध्ये होतायत आणि पेशंटची स्थिती जास्त क्रिटिकल नसेल तर काय हरकत आहे. आपल्यातील किती लोकांनी असल्या सुविधांचा लाभ घेतलाय. किती लोकांनी आजारी पडल्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाला भेट दिली आहे, किती लोक दहा रुपयाची शीव भोजन थाळी खाल्ली आहे? ह्या सगळ्या सुविधा शासन आपल्या टॅक्सच्या पैशांनी देतायत आणि ह्याचा उपभोग आपली लोक घेताच नाही आहेत सगळे परप्रांतीय भैया आणि मुसलमान घेत आहेत जे दुसऱ्या राज्यातील आहेत आणि टॅक्सही भरत नसतील.
    12

© 2025 Indiareply.com. All rights reserved.

All Groups
    • Loading...
RECENT POSTS
Clear
    Loading...
New notification
Message icon
a few seconds ago

Sign in to our platform

Lost Password?
Not registered? Create account