Community Information
-
•
समर्थ रामदास स्वामींचे हे पत्र संभाजी राजांस लिहिले आहे _ शिवराजास आठवावें
शेवटची चार पद्य जग प्रसिद्ध आहेत अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१|| काही उग्रस्थिती सोडावी| काही सौम्यता धरावी| चिंता लागावी परावी अंतर्यामी||२|| मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे| सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३|| पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना| तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४|| जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला| जन ठायी ठायी तुंबला| म्हणजे खोटे||५|| श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले| मग जाणावे फावले| गनीमासी||६|| ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए| धीर धरून महत्कार्य| समजूनि करावे||७|| आधीच पडली धास्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती| याकारणे समस्ती| बुद्धी शोधावी||८|| राजी राखिता जग| मग कार्यभागाची लगबग| ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९|| सकळ लोक एक करावे| गनिमा निपटुन काढावे| ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०|| आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके| ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११|| समय प्रसंग ओळखावा| राग निपटुन काढावा| आला तरी कळो न द्यावा| जनांमध्ये||१२|| राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक| लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३|| बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४|| आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे| महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५|| लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी| चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६|| शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे| इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७|| शिवरायांचे आठवावे रूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८|| शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसी असे||१९|| सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनेची लगबग| कैसी केली||२०|| त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१||5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.